सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

२९ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मंठा येथे होणार आयोजन



मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२५ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन तारीख 28 व 29 मे रोजी मंठा येथे होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंठा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत 29 वे साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक , मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे , जालना जिल्हा अध्यक्ष कुलदीप रुघे , भरत मानकर ,प्रा.गौतम वाव्हळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या संमेलनात ग्रंथदिंडी , उद्घाटन समारंभ , परिसंवाद , चर्चासत्र , कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात होणार आहेत. या साहित्य संमेलनात देशभरातून 400 साहित्यिक सहभागी होणार आहेत. तसेच या अगोदर सांगली , रत्नागिरी, नवी मुंबई , गोंदिया , बारामती या ठिकाणी संमेलन संपन्न झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.याप्रसंगी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत