सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन..अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना_


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 5 /7 /2022 रोजी अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार  बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व मूकबधिर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या, पेन, वाटप तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे
        असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी परतुर प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आढे, उपतालुका अध्यक्ष माऊली कदम यांनी पुढाकार घेतला तसेच तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत