लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन..अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना_


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 5 /7 /2022 रोजी अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार  बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व मूकबधिर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या, पेन, वाटप तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे
        असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी परतुर प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आढे, उपतालुका अध्यक्ष माऊली कदम यांनी पुढाकार घेतला तसेच तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत