धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

जालना जिल्ह्यात टवाळखोरांना आवर घाला, मनसे विद्यार्थी सेनेची मागणी



जालना: प्रतिनिधी समाधान खरात 
       जुन महिन्यात राज्यातील काॅलेज महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी तरुणीं या काॅलेज व महाविद्यालयात रस्त्याने पायी तर काही विद्यार्थींनी सायकल, स्कुटी, बसने जाणं येणं करत आसतात. तसेच जालना शहरात व जिल्ह्यात काॅलेज, विद्यालयाबाहेर टवाळखोरांची झुंबड ऊडतांना दिसुन येत आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. 
     या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जालना पोलीस अधिक्षक डाॅ.अक्षय शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जालना जिल्हा व शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी केली आहे. तसेट टवाळखोर व गुन्हेगार वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काॅलेज महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. आसी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी सुरवातीपासुनच जालना जिल्हा शिक्षण विभागाकडे लाऊन धरली होती. पण काॅलेज, व महाविद्यालय व्यवस्थापकांवर दबाव टाकून व दहशत निर्माण करुन टवाळखोरांनी प्रवेश मिळवला आसल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. टवाळखोर हे शिक्षणसाठी काॅलेज मध्ये येत नसतात. तर? धिंगा मस्ती करण्यासाठीच येत असुन जालना जिल्ह्यातील व शहरातील मुलींना मनमोकळे शिक्षण घेता यावे. आसे सिद्धेश्वर काकडे यांनी जालना पोलिस अधिक्षक यांच्याकडे ग्रहाणे मांडले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत