सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जालना जिल्ह्यात टवाळखोरांना आवर घाला, मनसे विद्यार्थी सेनेची मागणी



जालना: प्रतिनिधी समाधान खरात 
       जुन महिन्यात राज्यातील काॅलेज महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी तरुणीं या काॅलेज व महाविद्यालयात रस्त्याने पायी तर काही विद्यार्थींनी सायकल, स्कुटी, बसने जाणं येणं करत आसतात. तसेच जालना शहरात व जिल्ह्यात काॅलेज, विद्यालयाबाहेर टवाळखोरांची झुंबड ऊडतांना दिसुन येत आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. 
     या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जालना पोलीस अधिक्षक डाॅ.अक्षय शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जालना जिल्हा व शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी केली आहे. तसेट टवाळखोर व गुन्हेगार वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काॅलेज महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. आसी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी सुरवातीपासुनच जालना जिल्हा शिक्षण विभागाकडे लाऊन धरली होती. पण काॅलेज, व महाविद्यालय व्यवस्थापकांवर दबाव टाकून व दहशत निर्माण करुन टवाळखोरांनी प्रवेश मिळवला आसल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. टवाळखोर हे शिक्षणसाठी काॅलेज मध्ये येत नसतात. तर? धिंगा मस्ती करण्यासाठीच येत असुन जालना जिल्ह्यातील व शहरातील मुलींना मनमोकळे शिक्षण घेता यावे. आसे सिद्धेश्वर काकडे यांनी जालना पोलिस अधिक्षक यांच्याकडे ग्रहाणे मांडले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत