लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या कृष्णा आरगडे नगरसेवक यांची मागणी.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर येथील नगरसेवक मा. कृष्णा आरगडे यांनी परतूर मंठा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांना मंत्रिमंडळामध्ये परत एकदा मंत्री मंडळामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती.       ही जबाबदारी बबनराव लोणीकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे पार पाडून पाणीपुरवठा योजनेच नातं जिवंत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेला आहे .सतत दुष्काळात भरपळत असलेला मराठवाडा यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी केले असून परतूर मंठा तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हातून विविध विकास कामे झालेली आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर असणाऱ्या व चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आमदार बबनराव लोणीकर यांचा पुन्हा एकदा मंत्री मंडळात समावेश व्हावा ही परतुर तालुक्यातील तमाम जनतेची मागणी असल्याचे नगरसेवक कृष्णा आरगडे यांनी सांगितले..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत