धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

शिवसेना मंठा शिंदे गट तालुकाप्रमुखपदी उदय बोराडे यांची नियुक्ती


 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
   दि.०१ शिवसेनेच्या मंठा तालुकाप्रमुखपदी शिंदे गटाचे उदय प्रल्हादराव बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भूतेकर, प्रल्हादराव बोराडे, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. 
     यावेळी मंठा शिवसेना शहर प्रमुख पदी गणेश रामराव बोराडे यांची निवड करण्यात आली. उदय बोराडे व गणेश बोराडे यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला मंठा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करून गावा गावात शिवसेनेचे कार्य मजबूत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात त्यांचे विचार पोचविणार असल्याचे उदय बोराडे यांनी सांगितले.. उदय बोराडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी 2012 सली शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून तालुक्यात शाखाचां माध्यमातून सर्व अठरा पगड जातींच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्यात गेल्या 10 वर्षात तालुक्यात खूप कार्य केलेली आहेत व यासमोर ही सर्व शेतकरी बांधव असो सर्व क्षेत्रातील नागरिकांना माय बाप जाणते साठी 24 तास काम करेल.. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत