सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवसेना मंठा शिंदे गट तालुकाप्रमुखपदी उदय बोराडे यांची नियुक्ती


 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
   दि.०१ शिवसेनेच्या मंठा तालुकाप्रमुखपदी शिंदे गटाचे उदय प्रल्हादराव बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भूतेकर, प्रल्हादराव बोराडे, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. 
     यावेळी मंठा शिवसेना शहर प्रमुख पदी गणेश रामराव बोराडे यांची निवड करण्यात आली. उदय बोराडे व गणेश बोराडे यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला मंठा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करून गावा गावात शिवसेनेचे कार्य मजबूत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात त्यांचे विचार पोचविणार असल्याचे उदय बोराडे यांनी सांगितले.. उदय बोराडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी 2012 सली शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून तालुक्यात शाखाचां माध्यमातून सर्व अठरा पगड जातींच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्यात गेल्या 10 वर्षात तालुक्यात खूप कार्य केलेली आहेत व यासमोर ही सर्व शेतकरी बांधव असो सर्व क्षेत्रातील नागरिकांना माय बाप जाणते साठी 24 तास काम करेल.. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत