लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

दैठना खुर्द शिवारातील कसूरा नदीवरील पूल गेला वाहून, कसूरा नदीवरील रस्त्यातील पूल उभारण्याची मागणी

 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
       दैठना खुर्द शिवारातील शेतीकडे कसूरा नदीवरुण जाणारा पूल पावसाने वाहून गेला आहे. नवीन पूल उभरा नसता जलसमाधी घेण्याचा इशारा येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की दैठना खुर्द येथील पिंपळगाव रोड ते कुलकर्णी वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कसूरा नदीवरील पूल दि २७ व २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. कुलकर्णी वस्तीकडे हातडी लघु सिंचन तलावच्या खाली कसूरा नदी जात आहे. या नदी वरील पूल झालेल्या पावसाने नदीला पुरात वाहून गेला असल्याने या भागातील शेतकर्‍यांची शेती असल्याने अनेकांना शेती वहिती करण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यावरील पूल तात्काळ निर्माण करावा आमचे शेती मशागत करण्यासाठी जात येत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तात्काळ पूल उभारून रस्ता करावा नसता या पुलावरील पाण्यात जलसमाधी घेण्यात येईल. घडलेल्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. अण्णासाहेब सवने, विलास भदर्गे, भीमराज तयाडे, संदीप शिंदे, अमोल सवने, गणेश कदम, अमर राकूसले, लक्ष्मण मोरे, भगवान सोळंके, यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत