धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

आनंदाचा शिधा गरजुवंतांना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या तर्फे मोफत वाटप

परतूर/( प्रतिनिधी ) कैलाश चव्हाण 
  बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्यातर्फे आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला १०० रुपयात १ किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो रवा ,१ किलो तेल व इतर वस्तू अत्यंत माफक १०० रूपयात वितरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे मोहन अग्रवाल यांनी कौतुक करून अभिनंदन केले. जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी शिवसेनेच्या वतीने शहरातील अत्यंत गरजूवंत कुटुंबांना १०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा किटचे मोफत वितरण शिवसेना कार्यालय गार्डन हॉटेल शेजारी परतुर येथे केले. यात शेकडो गरजू कुटुंबाना मोफत आनंदाचा शिधा राशन कार्ड धारकास वितरण करण्यात आले,याप्रसंगी तालुका प्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे ,दत्ता अंभोरे ,सोपान कातारे ,रितेश अग्रवाल, अविनाश कापसे, कृष्णा अग्रवाल, विकास यादव, शिवसेना पदाधिकारी व आदी शिवसैनिकासह शहरातील लाभार्थी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत