सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दत्तात्रय खुळे यांना राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार

तळणी प्रतीनीधी रवी पाटील
      तळणी येथील युवा कवी साहीत्यीक दत्तात्रय खुळे यांचा राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने सम्मान
साहित्य क्षेत्रातील दत्तात्रय खुळे अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक पटकावले आहेत याआधी त्यांना समाजभूषण , काव्यगौरव पुरस्कार , ऑथर ऑफ द इअर अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एच पी गॅस तळणी येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना आपली नोकरी सांभाळून आपला छंद जोपासणारा उमदा कवी दत्तात्रय खुळे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील हिवाळी अधिवेशनात सेवा निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव , माजी महापौर उषाताई ढोरे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी सौ शीतल नगराळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ मधूसुदन घाणेकर,संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे सर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात आजही विविध क्षेञा मध्ये छाप टाकणारे तरुण पूढे येत असून त्याना खरी गरज आहे ती व्यासपीठाची कलेचे सादरी करण करण्यासाठी आजही कित्येक तरुण ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे यापैकी एक दत्तात्रय खूले अगदी गरीब कुंटूबांतील हा कवी गावाचे व परीसराचे नाव मोठे करत आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्था या संस्थेचे हिवाळीअधिवेशन 2022 आकृडी पुणे येथे उत्साहात पार पडले
आंतरराष्ट्रीय संस्थापक देवा तांबे, सचिव दीपक काळे , सुभाष हजारे आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय तळणी तसेच तळणी ग्रामस्थांच्या व तळणी ग्रामपंचायत च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला .

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत