सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते शिवरायांच्या व्यतिरिक्त रयतेचे राजे असे इतर कोणत्याही राजाला संबोधल्या गेले नाही असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते वारंवार शिवरायांचा अपमान करणारी वक्तव्य करत असून शिवप्रेमी जनता त्यांना बदडून काढेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असून औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजल खान यांचे उदात्तीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत, जितेंद्र आव्हाड हा मूर्खपणा वारंवार करत आहेत परंतु शिवरायांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या १०० पिढ्या यामुळे बरबाद होतील अशा शब्दात माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार औरंगजेब शाहिस्तेखान अफजलखान यासारख्या स्वराज्य दोन्ही व महाराष्ट्र द्रोही असणाऱ्यांचे उदातीकरण केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते औरंगजेब हा क्रूरकर्मा नसून सूफी संत होता तर अफजल खान हा शिवरायांना मारण्यासाठी आला नव्हता अशा प्रकारची मुक्ताफळे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून उधळली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार अशा प्रकारची शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी वक्तव्य केले जात असून या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब, शाहिस्तेखान, अफजल खान हे अधिक चांगले होते असे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका बनत चाललेली आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडतो आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

जितेंद्र आव्हाड शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य वारंवार करत असून स्वराज्यद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजलखान सारख्या क्रूरकर्म्यांची उदातीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का असा सवाल देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना विचारला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत