सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भवितव्य घडविणाऱ्या शिक्षणाची गरज- मा.आ बबनराव लोणीकर

परतुर - कैलाश चव्हाण 
   मुलाचे भविष्य घडविण्यासाठी आज चांगल्या शिक्षणाची गरज आहे. पालकांनी मुलाच्या दर्जेदार शिक्षणासाठी आग्रही राहिले पाहिजे. आजच्या युगात पुस्तके ज्ञानासोबतच विज्ञानाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहून शिक्षण द्यावेत ज्यामुळे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेचा सामना करू शकतील असे प्रतिपादन माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांनी शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे माननीय आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी भाषा गौरव दिन निमित्त आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी केले. 
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री. दिनकरराव चव्हाण तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शरद बोराडे, प्रा. यशवंत दुबाले, देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक सुबोध चव्हाण, डॉ. भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य भागवतराव नाईकनवरे, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, सुधाकर बापू सातोणकर ,कृष्णा अरगडे ,गणेशराव पवार, शत्रुघ्न कणसे, प्राचार्य गजानन कास्तोडे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर प्रयोगाचे आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी गीतांवर बहारदार नृत्य करून व विविध संतांच्या भूमिकेचे सादरीकरण करून उपस्थित सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवले. प्रेक्षकांनी मनमुरादपणे सदरील कार्यक्रमाचा आनंद लुटला व या चिमुकल्याच्या कलागुणाचे कौतुक केले.
 सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गजानन कास्तोडे तर सूत्रसंचालन नयना जईद, राखी मुंदडा तर आभार प्रदर्शन अरुणा दीक्षित यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना ककरिय, मनीषा लाळे, चंद्रकांत कपाळे, मनीषा लहाने, पूजा पावले, नूतन नलावडे, साक्षी झरेकर, प्रदीप चव्हाण, राजेश कार्लेकर, प्रदीप साळवे, बाळासाहेब कदम यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत