सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

उद्धव ठाकरे च्या त्या विधानाचा तीव्र निषेध आमदार बबनराव लोणीकर, बोलताना भान ठेवून बोला नसता तुमचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू - आमदार लोणीकर,उद्धव ठाकरे यांनी खुराड्यात बसून घर कोंबड्यासारखं फेसबुक वर राज्य चालवलं हे महाराष्ट्राचे दुर्दैव - आमदार लोणीकर



जालना प्रतिनिधी समाधान खरात 
कोरोना सारख्या भीषण संकट काळात राज्यातील जनता मरत असताना.. भीषण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांची पीक, शेतकऱ्यांची ढोर गुर वाहून जात असताना उद्धव ठाकरे घरात बसून घरकोंबड्या प्रमाणे राज्य फेसबुक वर चालवत होते. स्वतःच्या आमदार खासदार मंत्र्यांनाही भेटी देत नव्हते. उद्धव ठाकरे च्या अशा वागण्यामुळे पक्ष गेला चिन्ह गेले आमदार खासदार ही गेले खाली बाकी काहीच राहील नाही. 
   आता तरी राजकारणातील तज्ञ नेतृत्व, चानाक्ष नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, लोकप्रिय नेतृत्व मा. देवेंद्र जी फडणवीस साहेबांवर टीका करताना तारतम्य बाळगा नसता आम्हाला ही जशास तसे उत्तर देता येईल. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आता परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे केले.
 पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेताना म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितजी शहा देवेंद्रजी फडणवीस जेपी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे सुधीर भाऊ मुनगंटीवार आमच्या या नेत्यांवर टीका करताना भान ठेवून बोला नसता तुमचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तुम्हाला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही पुन्हा वारंवार अशीच टीका करत राहिल्यास महाराष्ट्रातील जनता तुमचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत