धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

पत्रकारांसाठीही स्वतंत्र मतदार संघ द्या!विकासकुमार बागडी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
    ज्याप्रमाणे शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी स्वतंत्र आमदार देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी देखील स्वतंत्र आमदार देण्यात यावा. पत्रकारांना देखील संरक्षणाची गरज असून त्यांना विमा, कर्ज योजना, घरकुल, शासकीय जाहिरात, मुलांचे शिक्षण, प्रवास सवलत, पेनशेन, भविष्य निर्वाह निधी, प्रलंबीत जाहिरात बील, अधिस्वीकृतीचा लाभ आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ हवा असतो. परंतू तो त्यांना मिळत नाही
   तो त्यांना देखील मिळाला पाहिजे. आमदार- खासदार, मंत्री व शासकीय अधिकारी हे पत्रकारांच्या समस्यांची कधीच दखल घेत नाहीत. म्हणूनच पत्रकारांसाठी देखील शिक्षक आणि पदवीधरांप्रमाणे स्वतंत्र आमदार पाहिजे. जेणे करुन त्यांच्या समस्या मार्गी लागतील. महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र आमदार देण्यात यावा.
तरी उपरोक्त समस्यांची मुख्यमंत्र्यांनी जातीने सोडवणूक करावी, अशी विनंतीही श्री. बागडी यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत