सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नामुळे परतूर शहरात विद्युत खांबासह पंच केबल जोडणी सुरू

परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण 

 परतुर शहरातील अनेक भागा मध्ये गेल्या कीत्येक वर्षापासूनची नागरीकांची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली असता.
   पालक मंञी आतूल सावे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जिल्हा नियोजन व विकास मंडळा मार्फत निधी मंजुर करावा असे आदेश दिलेअसता अग्रवाल यांनी शिवसेनेचे विभागीय नेते अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन विद्युत खांब व बंच केबल साठी निधी उपलब्ध करून घेतला. परतुर शहरासाठी शंभर विद्युत खांब व बंच केबल शहरासाठी उपलब्ध करून दिले परतुर शहरातील राजे संभाजीनगर ,आदर्श कॉलनी, जय भद्रा नगर, शिवनेरी नगर, पंचशील नगर, वडारवाडी, बालाजी नगर ,व्यंकटेश नगर ,एसटी कॉलनी नागोबा मंदिर जवळ, मोरे यांचा मळा ,जगन्नाथ नगर व इंदिरानगर अशा परतूर शहरातील विविध भागात नागरिकांच्या विद्युत लाईट विषयी समस्या लक्षात घेता विद्युत खांबसह बंच केबल जोडणी करून देत आहेत. तीनशे चारशे फुटाच्या अंतरावरुन नागरिकांनी विद्युत कनेक्शन जोडणी केलेली पाहता येणाऱ्या काळात घात घडू नये व गंभीर परिणाम होऊ नये.
 तसेच शहरातील नादुरुस्त झालेले रोहित यासाठी 35 लक्ष रुपये मुख्यमंत्री यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी सतत केलेल्या पाठपुरावामुळे उपलब्ध झालेले आहेत संबंधित नागरिकांना विद्युत खांब बंच केबलसह विद्युत कनेक्शन दिल्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा ठिकठिकाणी त्रस्त झालेले नागरिक सत्कार करत आहेत व त्यांचे आभारही मानत आहेत. यावेळी ईंदीरा नगर परीसरातील माजेद पठाण, उमर भाई, फिरोज शेख, नवीम शेख ,याकूब गुलाब शेख ,इमरान शेख, दिलदार पठाण, इस्माईल शेख इमरान शेख,आयान बागवान ,सलीम शेख ,लालाखान पठाण, शेख हसन भाई, कैलास जाधव ,समीर शेख ,अल्ताफ शेख, शाहिद पठाण , फरहान सय्यद व आदी इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचे आभार मानून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत