लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

यश माध्यमिक विद्यालय व यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
 आज दि. 13 जानेवारी 2024 शनिवार रोजी यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने ने करण्यात आली.कु.नेहा बिडवे, कु. संस्कृती , कु.सुनंदा दांगट आणि कु. वैष्णवी यांच्या आवाजातील जिजाऊ वंदना ऐकूण सर्वजण मंत्रमुग्ध झाले .
   यावेळी अनेक विद्यार्थी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभुषा धारण करून शाळेत दाखल झाले. 
  या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य शामीर शेख हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास गोरे , दिव्या तांगडे ,राधिका आकात उपस्थित होत्या.
    प्रारंभी मांसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
       यानंतर कु.काव्या सोळंके, आरुषी बर्डे, स्वानंदी आकात ,राजवीर सोळंके व दिव्यांका सुर्यवंशी,आरुषी लाटे, आरुषी बर्डे, समृद्धी होंडे व साक्षी सोनटक्के अशा अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली, तसेच स्वराली आकात व भक्ती देशमुख यांनी उन्हाळा आणि पावसाळा हे जिजामातेचे गीत गाऊन सर्वांची मने जिंकली. 

दरम्यान प्रशालेच्या वतीने वेशभूषेतील विदयार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.

  प्रशालेचे शिक्षक संतोष घरडे , बळीराम भले यांनी युगपुरुष विवेकानंद यांच्या विषयी तर विष्णू कुरधने, भावना पाटील यांनी जिजामाता कोण होत्या हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच राधिका आकात यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
 आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शामीर शेख यांनी जिजामातांनी कशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांना घडवले व स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान कसे होते हे समजावून सांगितले.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम चव्हाण यांनी तर आभार सीमा पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत