धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

आरती मुके ची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परतूर येथील आरती भाऊसाहेब मुके ची सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आंबेगाव पुणे या कॉलेज मध्ये बि.एस.सी. बायोटेक च्या द्वितीय वर्षात शिकते. तिची कॉलेज च्या वतीने २०२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली.
  आरती ही खर तर क्रिकेट मधील उत्कृष्ठ ऑल राऊंडर खेळाडू असुन ती कॉलेज च्या टीम ची कर्णधार आहे. परंतु क्रिकेट सोबत तिने कब्बडी व वॉलिबॉल मध्ये चमकदार कामगिरी बजावली म्हणून कॉलेज च्या वतिने तिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करून गौरवण्यात आले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पियुष हनुवंते सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
  या प्रसंगी सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. श्री. मगन घाटूळे, उप प्राचार्य दिपा रमाणी, क्रिडा प्रशिक्षण श्री. संतोष नवले, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख विभावरी दिक्षित, सोनल मॅडम, मनिषा मॅडम, ऋतुजा मॅडम, लोंढे सर आदिंचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या उपस्थितीत आरतीला मेडल देऊन सन्मानित केले..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत