सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अंतकरणात पाप नसेल तरच खाल्लेल पचत -ह भ प समाधान महाराज शर्मा

परतुरात शिवकथेला मोठा प्रतिसाद.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  गरिबांना चांगलं जेवण मिळत नाही म्हणून ते बेजार आहेत, तर श्रीमंतांना भूक लागत नाही म्हणून ते बेजार आहेत. मात्र खाल्लेले तेव्हाच पचत, जेव्हा तुमच्या अंतकरणात पाप नसेल असे निरूपण शिव कथा चार्य ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी चौथ्या दिवशी दिले.
माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आयोजित शिव कथा व कीर्तन सोहळ्यास परतुर तालुका व परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत आहे आज कथेच्या चौथ्या शहर भक्तिमय झाले होते. कथे चा विस्तार करताना ह भ प समाधान महाराज शर्मा म्हणाली की, काही लोक पहाटे काम मिळावं म्हणून पळतात तर काही लोक खाल्लेले पचन व्हावं म्हणून पळतात 'मत सोच जिंदगी के बारे मे इतना, जिसने भी है उसने भी सोच कर दि है.'तुमच्या हातून होत असलेले पाप बंद करा. तुम्हाला प्रणायाम असे काहीच करण्याची गरज नाही. मरणाला घाबरू नका. महिलांना पुरुषाला कडून प्रेम पाहिजे असते ते मिळत नाही आणि पुरुषांना महिलांकडून आदर पाहिजे असतो तो मिळत नाही म्हणूनच पती-पत्नीत वाद असतो जावयाने सासरवाडीला बोलायला शिका आहे जाऊ नये. सती न बोलवता जाते व अनर्थ घडतो. आपला देश पवित्र आहे. जेवढे अवतार झाले तेवढे भारतातच झाले. भविष्य बघायचं नसतं तर भविष्य घडवायचं असतं. आपला हात कोणालाही दाखवू नका पार्वतीचे भविष्य साक्षात संत नारदांनी बघितलं होतं. आणि तेच पुढे घडलं. स्वामी विवेकानंदांनी आपलं भविष्य स्वतः खूप कमी वयात घडवलं. नारदांनी पार्वतीचे भविष्य सांगितलं होतं की तिला मिळणारा पती हा साधा नसेल महायोगी, निर्गुण मोठा तपस्वी स्मशानात राहणारा, मळके कपडे घालणारा, बैलावर बसणारा असेल असे सांगितले होते. साक्षात तसेच घडले कारण पार्वतीने आपली तपश्चर्या पूर्ण केली होती. आणि पार्वतीला महादेव पती मिळाले असे सांगून पुढे महादेव पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे संगीतमय वातावरणात वर्णन करून शेवटी ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी कथेचा समारोप केला या कथेत माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी सभापती कपिल आकात, माधवराव कदम, कांतराव सोळंके, संग्राम लोणीकर, शाहूराव धुमाळ, संजय सावंत,सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत