लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

अंतकरणात पाप नसेल तरच खाल्लेल पचत -ह भ प समाधान महाराज शर्मा

परतुरात शिवकथेला मोठा प्रतिसाद.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  गरिबांना चांगलं जेवण मिळत नाही म्हणून ते बेजार आहेत, तर श्रीमंतांना भूक लागत नाही म्हणून ते बेजार आहेत. मात्र खाल्लेले तेव्हाच पचत, जेव्हा तुमच्या अंतकरणात पाप नसेल असे निरूपण शिव कथा चार्य ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी चौथ्या दिवशी दिले.
माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आयोजित शिव कथा व कीर्तन सोहळ्यास परतुर तालुका व परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत आहे आज कथेच्या चौथ्या शहर भक्तिमय झाले होते. कथे चा विस्तार करताना ह भ प समाधान महाराज शर्मा म्हणाली की, काही लोक पहाटे काम मिळावं म्हणून पळतात तर काही लोक खाल्लेले पचन व्हावं म्हणून पळतात 'मत सोच जिंदगी के बारे मे इतना, जिसने भी है उसने भी सोच कर दि है.'तुमच्या हातून होत असलेले पाप बंद करा. तुम्हाला प्रणायाम असे काहीच करण्याची गरज नाही. मरणाला घाबरू नका. महिलांना पुरुषाला कडून प्रेम पाहिजे असते ते मिळत नाही आणि पुरुषांना महिलांकडून आदर पाहिजे असतो तो मिळत नाही म्हणूनच पती-पत्नीत वाद असतो जावयाने सासरवाडीला बोलायला शिका आहे जाऊ नये. सती न बोलवता जाते व अनर्थ घडतो. आपला देश पवित्र आहे. जेवढे अवतार झाले तेवढे भारतातच झाले. भविष्य बघायचं नसतं तर भविष्य घडवायचं असतं. आपला हात कोणालाही दाखवू नका पार्वतीचे भविष्य साक्षात संत नारदांनी बघितलं होतं. आणि तेच पुढे घडलं. स्वामी विवेकानंदांनी आपलं भविष्य स्वतः खूप कमी वयात घडवलं. नारदांनी पार्वतीचे भविष्य सांगितलं होतं की तिला मिळणारा पती हा साधा नसेल महायोगी, निर्गुण मोठा तपस्वी स्मशानात राहणारा, मळके कपडे घालणारा, बैलावर बसणारा असेल असे सांगितले होते. साक्षात तसेच घडले कारण पार्वतीने आपली तपश्चर्या पूर्ण केली होती. आणि पार्वतीला महादेव पती मिळाले असे सांगून पुढे महादेव पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे संगीतमय वातावरणात वर्णन करून शेवटी ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी कथेचा समारोप केला या कथेत माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी सभापती कपिल आकात, माधवराव कदम, कांतराव सोळंके, संग्राम लोणीकर, शाहूराव धुमाळ, संजय सावंत,सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत