सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय परतुर इयत्ता बारावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

*

परतुर - प्रतिनीधी कैलाश चव्हाण
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळांनी इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला असून लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय परतुर कला, विज्ञान वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल 66.77 लागला असून महाविद्यालयातून एकूण 915 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेत सर्वप्रथम कु. पवार पल्लवी 81 टक्के, सर्व द्वितीय कु.धुमाळ वैष्णवी 78.83% सर्व तृतीय वितळे नम्रता 78.17% 

 वाणिज्य शाखा सर्वप्रथम पाठक ऋतुजा 80.50 टक्के सर्व द्वितीय कळणे गायत्री 79 50%सर्वत्रितीय शिकलगार रेहान 72.17% 

कला शाखा सर्वप्रथम किरण बेरगुडे 90.67%द्वितीय आरती मोहिते सर्व तृतीय रोहिणी 85 टक्के रोहिणी बिजूले 79.50% 
 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात संस्थेचे सचिव कपिल भैया आकात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.कुणाल दादा आकात लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालय प्रमुख सुधाकर काटे, प्रभाकर सुरूंग प्रा.डॉ. दत्तात्रय राऊत प्रा. रवींद्र जोशी प्रा. इघारे जालिंदर प्रा. संतोष अंभोरे प्रा.गणेश अग्रवाल प्रा. विलास खरात प्रा. भगवान वाघराळ प्रा. धनंजय जागृत प्रा. शिवाजी लोखंडे प्रा. शिवाजी आकात प्रा. खरात प्रमोद नागरगोजे शरद पतंगे, शरद पवार इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत