लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

सिंगोना येथील मयत पांडुरंग कदम यांच्या वारसाला एसबीआय बँकेकडून ४० लाखांचा विमा धनादेश सुपूर्द,दोन हजार रुपयांच्या पॉलिसीने कुटुंबाला दिला आर्थिक आधार


परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा 
तालुक्यातील सिंगोना येथील रहिवासी पांडुरंग अंजीराम कदम (वय ४२) यांचे गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंगोना पाटीवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अवघ्या दोन हजार रुपयांचा प्रिमियम भरून जनरल इन्शुरन्स अपघाती विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या या अपघाती निधनानंतर बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अत्यंत तत्परतेने त्यांच्या वारसाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मंजूर केला. 
 या मंजूर विमा रक्कमेचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश मयत पांडुरंग कदम यांच्या वारसदार पत्नी शिला पांडुरंग कदम यांना १० जून २०२६ रोजी परतूर येथील 'एसबीआय' मुख्य शाखेत मुख्य शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपलेल्या कदम कुटुंबाला या कठीण काळात बँकेच्या दोन हजार रुपयांच्या पॉलिसीमुळे चाळीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक छत्र लाभले आहे. या विमा रक्कम धनादेश वितरणप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक विजय राम, उपप्रबंधक हर्षवर्धन मुन, संध्या रसाळ, प्रज्वल सावंत, योगेश धानुरे, आकाश राजनकर, अशय नानवटकर, वैष्णवी क्षीरसागर, शिवाजी कुलकर्णी, मुलगा सहदेव कदम, भाऊ विठ्ठल कदम,भरत सुरुंग यांच्यासह बँक कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाने व बँकेच्या ग्राहकांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील सुरक्षेसाठी अशा विमा योजनांचा लाभ घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने मुख्य शाखा व्यवस्थापक विजय राम यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत